माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी जल जीवन मिशन योजने संदर्भात चौकशीची केली होती मागणी,पुढे काय?

लातूर bedhadak awaj दि/26/04/2025
जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून सुमारे 1500 कोटी रुपयांचा जल जीवन मिशन या योजनेसाठी नीती उपलब्ध करून देण्यात आला होता.
लातूर जिल्ह्यातील 352 गावांमध्ये या पेजल योजनेची योजना राबवण्यात आली मात्र अद्याप पर्यंत एकाही गावांमध्ये या योजनेचे काम पूर्णत्वास गेले नाही यामुळे अनेक गावांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. याच आशियाचे पत्र तत्कालीन खासदार सुधाकर शृंगारे यांनी या कामांमध्ये दिरंगाई होत असल्यामुळे याची चौकशी व्हावी अशा आशियाचे पत्र माननीय जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना आशियाचे पत्र लिहिले होते यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली मात्र त्यामधून काहीही निष्पन्न झाल्याचे दिसून येत नाही. तसेच जल जीवन मिशन या योजनेचे काम अनेक ठिकाणी सुरू असताना नागरिकांकडून या योजनेद्वारे नवीन नळ कनेक्शन करिता नागरिकांमार्फत ठीक ठिकाणी पैसे घेत नवीन नळ कनेक्शन देण्याचे चित्र होते व अशा चर्चांना उधाण हि आला होता. मात्र सध्या स्थिती पाहता उन्हाळ्याची उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला सहन करण्याची वेळ आली असतानाच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सध्या उद्भवत आहे. सध्या स्थिती पाहता नागरिकांसमोर तळ आहे पायथ्याशी आणि कोरड आहे घशाशी अशीच परिस्थिती सध्या लातूर जिल्ह्यात उद्भवत आहे. मात्र मूग गिळून गप्प बसलेल्या लातूर प्रशासनाने योग्य वेळीच जलजीवन मिशनचे काम पूर्णत्वास आणले असते तर सध्या स्थिती परिस्थिती वेगळी असती अशी नागरिकांतून चर्चा केली जात आहे.