लातूरच्या त्या मुख्याध्यापकाने 14 मुलींचा विनयभंग केला? मुख्याध्यापकाला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

बेधडक आवाज (जिल्हा प्रतिनिधी)
मराठवाड्यात लाजिरवाणी घटना आज रोजी घडली आहे.लातूरमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले आहे.लातूर जवळील हरंगुळ (खुर्द)या गावी जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकाने 14 मुलींचा विनभंग केल्याची घटना आज दि 30/11/2024 रोजी घडली आहे. या घटनेने हरंगुळ येथील जनता व पालक मोठ्या प्रमाणात संतप्त भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत.या
प्रकरणाविरोधात तात्काळ midc पोलीस स्टेशन लातूर या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याप्रकरणी मुख्याध्यापकाला तात्काळ निलंबित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या घटनेनंतर लातूर जिल्ह्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.या घटनेबाबत विद्यार्थिनींनी पालकांना याबाबत सविस्तर माहिती दिली असता, पालकांनी तात्काळ मुख्याध्यापकाला या घटने बाबत चौकशी करून,गट शिक्षण अधिकाऱ्याकडे या घटनेची तक्रार करण्यात आली असून यानंतर शाळेत विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीमार्फत 14 पीडित मुलींच्या तक्रारीची चौकशी करण्यात आली असून मुख्यध्यापकांनेच या 14 मुलींचा विनयभंग केल्याचं निष्पन्न झाले असून, मुख्याध्यापका विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटने विरोधात पोलीस पुढील तपास करत आहेत.