लातूर जिल्ह्यातील खंडोबा यात्रेत बारा बैल गाड्या एकहाती ओढण्याचा थरार.

बेधडक आवाज -(जिल्हाप्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यातील सेलूजवळील जवळगा गावात भरत असलेल्या खंडोबा यात्रेला राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या यात्रेची खासियत म्हणजे एका व्यक्तीकडून बारा बैल गाड्या एकत्र ओढल्या जाण्याचा अनोखा आणि थरारक प्रकार. या आगळ्या-वेगळ्या परंपरेमुळे ही यात्रा चर्चेचा विषय ठरते.
बारा बैल गाड्यांचा थरार
यात्रेत एका विशिष्ट व्यक्तीकडून बारा बैल गाड्या ओढल्या जातात. गाड्यांवर लहान मुले, तरुण मंडळी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने बसतात. हा थरारक प्रकार 500 मीटर अंतरासाठी सादर केला जातो. विशेष म्हणजे, या यात्रेच्या निमित्ताने जवळपासच्या 10 ते 15 गावांतील वारूही शोभायात्रेत सहभागी होऊन वातावरणात उत्साह आणतात.तसे पाहता
खंडोबा यात्रेचा इतिहास सुमारे 100 वर्षे जुना आहे. हा सांस्कृतिक सोहळा भाविकांना केवळ धार्मिक अनुभव देत नाही तर परंपरेचा वारसा जपण्याचा संदेशही देतो. गाड्या ओढणाऱ्या व्यक्तीला यात्रा सुरू होण्याआधी खंडोबाच्या देवळात आंघोळ घालून तयार केले जाते. त्यानंतर, मारुती मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालून हा थरारक सोहळा सुरू होतो.याच बोरोबर
यात्रेच्या ठिकाणी लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी उपलब्ध असतात. लाकडी घोडे, फुगे, गाड्या यांसारख्या खेळण्यांचे स्टॉल्स मुलांच्या आनंदात भर घालतात. महिलांसाठी स्टेशनरी, सजावटीचे साहित्य, सौंदर्यप्रसाधने आणि घरगुती वस्तूंच्या बाजारपेठा आकर्षक ठरतात. या स्टॉल्समुळे यात्रेत एक वेगळेच रंग भरले जातात.याच बरोबर
खाद्य पदार्थांचा मेळावा या ठिकाणी भरला जातो या
यात्रेतील खाद्यपदार्थांची विशेष ओळख आहे. गरमागरम जिलेबी,भजी, पेढे, बर्फी यांसारख्या पदार्थांनी यात्रेचे स्वादपूर्ण वातावरण निर्माण होते. स्थानिक व्यापाऱ्यांपासून ते बाहेरील विक्रेत्यांपर्यंत अनेकजण आपल्या पदार्थांनी भाविकांचे स्वागत करतात.तसेच
खंडोबा यात्रेतील बारा बैल गाड्यांचा प्रकार हा या उत्सवाचा प्रमुख आकर्षण आहे. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक लांबून लांबून येतात, ज्यामुळे यात्रेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
यात्रेच्या दरम्यान गावात मेळावा भरतो, ज्यामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. आजूबाजूच्या गावांतील लोक यात्रेला येऊन आपले योगदान देतात आणि तीर्थ व प्रसादाचा लाभ घेतात.