क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

संतोष देशमुख हत्याकांड: बीड जिल्ह्यात गुन्हेगारी, जातीवाद आणि राजकीय साखळीचा भयानक चेहरा उघड.

बेधडक आवाज – (बीड)
जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची अमानुष हत्या ही गुन्हेगारी आणि राजकीय वर्चस्वाच्या संघर्षाचे भयानक उदाहरण ठरली आहे. ३ तास हालहाल करून, लायटरने डोळे जाळणे, फायटर आणि वायरने क्रूरपणे मारहाण करणे, अशा पाशवी प्रकाराने संतोष देशमुख यांचा जीव घेतला गेला. या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप होत आहेत.

ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, वाल्मिक कराडच्या आदेशावरून ही हत्या झाली. आरोपींनी छळ करतानाचे व्हिडिओ काढून व्हायरल केले, ज्यामुळे या गुन्ह्याचे भयावह स्वरूप उघड झाले. पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याने प्रशासनावर दबावाचा आरोप होत आहे.

वाल्मिक कराड, जो पूर्वी गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबात सामान्य शिपाई होता, तो आता बीड जिल्ह्याचा अघोषित मालक बनला आहे. धनंजय मुंडेंच्या राजकीय पाठिंब्याने त्याने पोलिस व प्रशासनाला आपल्या हातात ठेवले असल्याचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे २०० हून अधिक व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडले आहे.

या घटनेवर भाजप आमदार सुरेश धस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दडपण्याचा आरोप केला आहे. तसेच, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागील साखळी उघड करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक व औद्योगिक परिस्थिती धोक्यात आली असून, जातीयतेच्या विषारी राजकारणाला पोषक वातावरण मिळाले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्वरित लक्ष घालून न्याय देण्याची गरज आहे, अन्यथा अशा घटनांचा जिल्ह्यात पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button