अमित देशमुख यांना अर्चना पाटील यांची नव्हे तर विनोद खटके निवडून येतील याची “सर्वाधिक भीती”!

बेधडक आवाज (जिल्हा प्रतिनिधी)
व्ही एस पॅंथर संघटनेचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे दलितांचे कैवारी,दलितांच्या हाकेला अर्ध्या रात्रीही सहजरित्या उपलब्ध होणारा संघटक म्हणून आज विनोद खटके यांच्या कडे पाहिले जाते, विनोद खटके फक्त दलितांचेच नाही तर अठरापगड जातीत मित्रत्वाचा केंद्रबिंदू अशीही त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. विनोद खटके हे फक्त व्हीएस पॅंथर संघटनेचे सर्वेसर्वा नसून भारतीय जनता पार्टीत हि त्यांचे स्नेहबंध पाहायला मिळाले आहेत. परंतु विनोद खटके विधानसभेच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी भारतीय जनता पार्टीतून न उभरता वंचित बहुजन आघाडी या पक्षातून उभा राहणं हे त्यांनी योग्य समजलं. याचे कारण असेही असू शकतं की वंचित बहुजन आघाडी हे वंचितांसाठी आघाडी बनवू शकते. व विनोद खटके यांना मोठ्या मताधिकाने

निवडून आणू शकते असाही असू शकतो.विनोद खटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी जो जनसमुदाय दाखल झाला होता. जी महा भव्य सभा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी झाली होती. जो विश्वास वंचितांनी मुस्लिमांनी व इतर समाजाने विनोद खटके यांच्या वरती दाखवला व मोठ्या पाठिंब्याने विनोद खटके यांच्या मागे उभा राहिला.याचीच कुठेतरी भीती अमित देशमुख यांच्या मनात घर करून राहिली असावी, व आपली आमदारकीची सीट कुठेतरी संपुष्टात येत आहे याची जाणीव जेव्हा आम्ही देशमुख यांना झाली. तेव्हा अमित देशमुख यांनी राजकारण करत इच्छुक असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदारांना भर
विधानसभेच्या रणधुमाळीत पक्ष प्रवेश करण्यास भाग पाडले.जो समाज माजी खासदार सुधाकर शरंगारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तोच समाज आज अमित देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी केविलवाणी इच्छा अमित देशमुख यांची असू शकते. याचाच अर्थ असा असू शकतो की अमित देशमुख यांना तीन महिन्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या सूनबाई झालेल्या अर्चनाताई पाटील या निवडून येतील यांची भीती नसून, सर्वसामान्यातला नेता,संघटक,विनोद खटके हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. याची भीती अमित देशमुख यांना नक्कीच असावी.