
Latur -bedhadak awaj
आगोदर स्वतः पोसलेले झाड दाखवा,मगच झाडावर कुह्राडी चालवा,,,,लातुरकर.
आयुष्यात एकही झाड कधी लावले नाही; जहांगीर समजुन बापाची लातुर जिल्हात खुलेआम कत्तल होत आहे झाडांची,,,,
मुळात सद्या जागतीक तापमान आणि हवामान यांचा आलेख पाहिला तर मानवतेच्या विध्वंसकतेकडे अगदी जलद गतीने मार्ग क्रमण चालू आहे.
याच धर्तीवर आपला लातुर जिल्हा अनेक वर्षे झाले दुष्काळ ग्रस्त म्हणुन घोषित केलेला आणि वास्तविक आसतना,,,,
चालू ऊन्हाळा अतिशय तिव्र आहे.यात सावली चा जिव्हाळा नाही कोणाला?
जिथे झाड तीथे सर्व नैसर्गिक जिवाला आराम मिळणारच तेही फुकटात,,मग झाडे,सावली,ऑक्सिजन यांच्याच जिवावर जगणारे लातुरचे सरकारी पट्टा घातलेले लोक राजरोसपणे मुख्य रस्त्यावर असलेल्या झाडांची कत्तल करून कोणाच्या आदेशाचे पालन करत आहेत.
नाही म्हणजे मुळात कोनतेही अवैध काम केले की समाज माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना सर्व सरकारी श्वान हे वरचा आदेश आहे.आसे सांगतात,, आजपर्यंत हा वरचा कोण हेच समजलं नाही.
लोकशाही च्या नियमानुसार जिल्हा पातळीवर विचार केला तर सर्वात वरचा जिल्हाधिकारी आसतो.
तसे ही म.न.पा.च्या जन सुविधा उपलब्ध नाहीत पण का कुणास ठाऊक लातुरला म.न.पा.घोषीत करुन काय साध्य करायचे आहे ते समजत नाही.
विषय व्रक्षतोडीचा आहे तर या प्रश्नावर काम करताना मा.प्रथम महीला जिल्हा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या बाई साहेब अनेक ठिकाणी व्रक्षलागवडीचे महत्त्व आणि गरज या वर मोठ मोठे भाषण ठोकतात.अनेक व्रक्ष प्रेमी लोकांन सोबत सेल्फी काढतात.प्रसार माध्यमातून मि एक नैसर्गिक प्रेमी आहे.आणि अधिकार प्राप्त आहे तोपर्यंत लातुरात हरीत क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत राहणार आसा दिखावा तर करत नाहीत ना?
कि लातुरच्या इतीहासात म्हणजे कोणीही अधिकारी आसो,,,गडीचा आदेश पालण केला तरच खुर्चीवर स्थीर राहणार.नाही तर उचलबांगडी या प्रणालीचा बळी.आस तर काही नाही ना?
गेली अनेक वर्षे झाली काही व्रक्ष प्रेमी लोकांनी एक संघ होऊन स्वयंप्रेरणेने स्वखर्चाने संपूर्ण शहरात व्रक्षलागवडीचे महत्त्व जाणून लागवड केली आहे.
त्यांना ही उत्तम समाज कार्य केले म्हणून सन्मानित केले गेले.
मग आज त्याच लोकांना शासनाने चालू केलेल्या व्रक्षतोडीचा विरोध करण्यासाठी रोडवर उतरुन आवाज उठवावा लागत आहे.हे नेमक काय?
लातूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न तोंड वासून उभे आहेत.ते शासन, प्रशासन,म.न.पा., जिल्हा परिषद ला दिसत नाही का?
या व्रक्षतोडीचा विरोध करण्यासाठी रोडवर उतरलेल्या लोकांना लातूर महानगरपालिका संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्तर असं आहे की परमपूज्य भारतरत्न पुरस्कार प्राप्त श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांनी काढलेल्या मिरवणुकीत आसलेल्या डॉल्बी सिस्टीम ला अडथळा निर्माण होतो आहे.त्या त्या ठीकानच्या व्रक्षांची छाटनी करुन द्यावी आसे निवेदन सादर केले आहेत.
आता या विषयावर चर्चा होण्याऐवजी उलट पक्षी सरकारने किंवा प्रशासनाने काय करायला पाहिजे हे सांगण्या इतके लातुरचे प्रशासन मुर्ख नाही.
सदरील निवेदनावर व्रक्षतोडीचा आदेश देताना जिल्हाधिकारी यांना ग्रहीत धरले होते का?
की हम बोले सो कायदा हा हतकंडा वापरला?
एका ही महामानवांनी वृक्ष तोडीचे समर्थन केले आहे आज पर्यंत इतिहासात वाचले नाही.
मग बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हि व्रक्षतोड,,की कर्णकर्कश आवाज प्रणाली व अ सांस्कृतिक पद्धतीने साजरे केले जाणारे उत्सव आणि त्यात सहभागी राजकीय पक्षाचे डोंबकावळे यांच्या मनधरणी साठी ही व्रक्षतोड आहे का?ह्याचे उत्तर जिल्हाधिकारी बाई साहेब देणार का?
झाड आणि प्राणवायू हा कधीच जात,धर्म, पंथ,पाहत नाही.
मग सर्वांनी या व्रक्षतोडीचा विरोध केला पाहिजे का?
ज्यांनी आयुष्यभर कधीही एकही झाड लावले नाही.त्यांनी आसे निवेदन आणि आसे आदेश देण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या पानावरुन मिळवला ते जाहीर करा.
व्रक्षतोडीचा गुन्हा या प्रकरणी लागु होतो की नाही हे ही लातुरच्या विधी तज्ञांनी सांगावे.
एकंदरीत काय तर ज्ञान सांगे लोकांना आणि शेंबूड आपल्या नाकाला आस तर चालु नाही ना?
कि कायदा फक्त आम जनतेला बाकी हुकुमशाही,, हजारो वृक्षतोडीला कारणीभूत प्रशासनाची हलगर्जीपणा व वृक्षप्रेमी म्हणून वावरणाऱ्या जिल्हाधिकारीच असाव्यात असा काहीसा समज सामान्य वृक्षप्रेमींचा असावा….