क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारणशिक्षण

लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल.

Bedhadak awaj प्रतिनिधी | लातूर दिनांक: 31 मे 2025
शाळेत जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना लातूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिन्यांच्या कारावासाची आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सन 2022 मध्ये मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुली शाळा आणि ट्युशनला जात असताना त्यांचा वारंवार पाठलाग केला जात होता. याबाबत संबंधितांनी तक्रार दिल्यानंतर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी अशोक शिवाजी अडसुळे (वय 31) आणि बाळू उर्फ विजय भागवत लोहार (वय 34, दोघेही रा. बोरगाव काळे, ता. व जिल्हा लातूर) यांनी मुलींचा पाठलाग करून त्रास दिला होता.

या प्रकरणाचा तपास मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली केला. तपासादरम्यान आरोपींविरुद्ध ठोस पुरावे जमा करण्यात आले आणि दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणात भारतीय दंड विधान संहिता कलम 354(ड) अंतर्गत आरोपींना दोषी ठरवले असून, त्यांना सहा महिने साध्या कारावासाची व प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांसह कोर्ट ट्रायल मॉनिटरिंग सेलचे पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील, कोर्ट पैरवी अमलदार इम्रान शेख आणि महिला पोलीस अंमलदार प्रेमला सगर यांचे मोलाचे योगदान लाभले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे सदर गुन्ह्यात न्यायालयीन यश प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button