स्मशानभूमीत पार पडले अनोखे लग्न!

Bedhadak awaj :-वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे एका अनोख्या विवाह सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इतर ठिकाणी मंगल कार्यालयात किंवा मंदीरात लग्नसोहळे पार पडतात, मात्र येथे थेट स्मशानभूमीत विवाह लावला गेला.
स्मशानभूमीत विवाहाचा निर्णय का?
अनसिंग येथील मसनजोगी समाज वर्षानुवर्षे स्मशानभूमीत वास्तव्य करतो. या समाजातील लोकांची उपजीविका अंत्यसंस्कार विधींसाठी लागणाऱ्या सेवांवर अवलंबून असते. या समाजातील ममता आणि हिंगोलीच्या ओमप्रकाश यांचा विवाह ठरला. मात्र, इतर ठिकाणी लग्न करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पर्याय नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांच्या परवानगीने थेट स्मशानभूमीत विवाहसोहळा पार पडण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकाचवेळी अंत्यसंस्कार आणि विवाहसोहळा!
विवाहाच्या दिवशीच गावातील एका प्रतिष्ठित नागरिकाचे निधन झाले होते. त्यामुळे एकीकडे अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे विवाह विधीही पार पडत होते. प्रथम मृत्यूपत्र विधी पार पडला, त्यानंतर नवदांपत्याचे मंगलाष्टक वाजले.
या अनोख्या विवाह सोहळ्याला गावकऱ्यांनी उपस्थित राहून नववधू-वरास शुभेच्छा दिल्या. मृत्यू आणि नवजीवन यांचा संगम असलेल्या या लग्नाने सर्वांच्या मनात वेगळाच ठसा उमटवला.