जनसेवेचा वारसा घेऊन निघालेल्या रुद्राली ताईकडे का फिरवत आहेत पाठ, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते.

बेधडक आवाज मुख्यसंपादक – (शरद पवार )
अर्चना पाटील चाकूरकर यांची कन्या ह्या साई फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा नेहमीच हाथ देत असतात. संपूर्ण जगावरती उद्भवलेले कोरोनाच्या संकटकाळी रुद्राली पाटील यांनी कशाचीही पर्वा न करता अनेक गरजूंना घरपोच अन्न राशन किट उपलब्ध करून दिले. याच काळामध्ये अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी गोरगरिबांना आर्थिक मदत म्हणून नवरात्रीत ज्याप्रमाणे महाप्रसाद वाटप केला जातो त्याप्रमाणे खिचडी वाटप करून आम्ही खूप मोठे पुण्य दान करत आहोत अशी सोशल मीडिया वरती घवघवा करून स्वतःची प्रसिद्धी केली. मात्र याच काळात रुद्राली पाटील यांनी दिल्ली ते लातूर पर्यंत अनेक गरजूंना घरपोच

राशन किट दर महा घरपोच उपलब्ध करून दिल्या. यात काही पत्रकार, सामान्य पोलीस कर्मचारी, गरजू ड्रायव्हर, अनेक अशी घर होती की ज्यांचं पोट उदरनिर्वाह शिवाय भागू शकत नव्हतं. अशा नागरिकांना त्यांनी दिलेली सुविधा ते कधीही विसरू शकतील असे कदापी होऊ शकणार नाही. आज तीच चाकूरकरांची नव्हे तर लातूरची कन्या लातूरच्या विकासासाठी येथील जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी दारो – दारी लातूरच्या जनतेचे विकसित भविष्याचे स्वप्न उराशी बाळगून एक लेक स्वतःच्या आईच्या यशासाठी खंबीरपणे पाठबळ म्हणून स्वतः रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळते. लेकीला विश्वास आहे की जर आपली आई निवडून आली तर लातूरच्या जनतेसाठी अनेक सुख सुविधा देऊ शकते, सामान्यांचे प्रश्न जाणून त्यांच्यावरती तोडगा काढू शकते,लातूर
शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे काम अर्चना पाटील करतील हा विश्वास जितपत लेकीला आहे तितकाच विश्वासला जनतेलाही असावा,, परंतु जे राजकारण लोकसभेच्या इलेक्शन मध्ये लातूरच्या जनतेने पाहिलं ते म्हणजे भारतीय जनता पार्टीतील आपसीवाद,या आपसीवादामुळेच खासदार सुधाकर शृंगारे यांना पराभव स्वीकारावा लागला. हे स्वतः सुधाकर शृंगारे यांनी मान्य ही केलेल आहे. त्याच राजकारणाची चाहूल विधानसभेमध्ये दिसून येताना आज रोजी पाहायला मिळते. आज अर्चना पाटील चाकूरकर यांची लेक व जावई लातूर शहरातील अनेक भागांमध्ये प्रचार करत असताना, भारतीय जनता पार्टीतील सक्रिय कार्यकर्ते चार ला
आठ व ढोलकी वाजवणारे धा अशा स्वरूपात निदर्शनास येताना पाहायला मिळाले. यातूनच दिसून येत आहे की भारतीय जनता पार्टीच्या आपसीवादात कार्यकर्ते सुद्धा अर्चना पाटील चाकूरकर यांचा प्रचार करण्यात पाहिजे तशी उत्सुकता नसल्याने व उमेदवारावरील नाराजगी दिसून येत असल्याने भविष्यात अर्चना पाटील चाकूरकर यांना अपयश स्वीकारावे लागणार कि काय अशी चर्चा लातूर शहरात जागोजागी चालू आहे. मुलीची तळमळ आईला निवडून आणण्याची तर कार्यकर्त्याची मात्र आमचा नेता उमेदवार का नाही म्हणून प्रचाराला पाठ फिरवण्याच काम या ठिकाणी केले जातंय कि काय हा सवाल मात्र नागरिकांना पडला असावा.