नागरिकांच्या मनातील लाडकी बहीण विधानसभेचा गड जिंकणार! प्रेमळ स्वभाव व नागरिकाप्रती आपुलकी हे शस्त्रच विरोधकांना जड जाणार.

बेधडक आवाज मुख्यसंपादक-(शरदपवार)दि-05/11/2024
भारतीय जनता पार्टीच्या वतीने लातूर शहरी विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी अनेक उमेदवारांची रसिखेच होताना आपल्याला पाहायला मिळाली.विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी अनेक उमेदवारांनी दिल्लीच्या पायऱ्या झिजवल्या तर कोणी स्वतःचे नेटवर्क वापरून विधानसभेचे तिकीट आम्हालाच मिळावे याचा पुरेपूर प्रयत्न उमेदवारांनी केला. परंतु कालावधीने डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या इतर उमेदवारांचे कार्यकर्ते व स्वतः उमेदवार मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचे चित्र सोशल मीडिया वरती फिरू लागले. व चर्चेला उधाण आले की आम्ही पक्षासाठी रात्रंनदिवस एक केला,पक्षाला व

पक्षाच्या कार्याला जनसामान्यापर्यंत पोहोचण्याच काम आम्ही अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे केले.या प्रामाणिक कार्याचे व पक्षाप्रती एकनिष्ठतेचे फळ मात्र तीन महिन्यापूर्वी पक्षप्रवेश करणाऱ्यांना मिळाले.अशी उलट सुलट चर्चा संपूर्ण लातूर जिल्ह्यात तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यात होण्यास सुरुवात झाली असताना.डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांनी क्षणिक कालावधीमध्येच सर्व सामान्य नागरिकांचे मन जिंकण्यात यश संपादन केले,व आपल्या प्रेमळ स्वभावाने व आपुलकी संवादाने मात्र कष्टकरी, मोलमजुरी करणारे पुरुष असो या स्त्रिया यांच्या मनावरती व विचारांवरती त्यांनी आपली वेगळीच छबी निर्माण केल्याचे स्पष्ट दिसून येत
आहे. या सर्व घटनाक्रममध्ये लातूरकरांना आजवर मिळालेली वांजुटी आश्वासने व नळाला बसवण्यात आलेल्या गंजुट्या तुट्या या गोष्टीचा नाहक त्रास आजवर जाणवत असावा याच कारणाने आज डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांच्या पदयात्रेस व संवाद बैठकीस मिळणारा प्रतिसाद भविष्यातील विधानसभा उमेदवार निवडून येण्याचे चिन्ह व संकेत मिळत असल्याने नागरिकांच्या मनातील लाडकी बहीण विधानसभेचा गड जिंकणार!तर विरोधी पक्ष नेत्यांचे स्वप्न भंगणार याची चर्चा मात्र लातूर शहरातील चौका-चौकात गल्लोबोळात होताना दिसत आहे.