अभिमन्यू पवारांनी त्यांच्या मित्र व कार्यकर्त्यांच्या अशा 32 जणांच्या नावे खरेदी केलेल्या प्रॉपर्ट्या तर 22 प्रायव्हेट कंपन्या.हा आहे खरा विकास!

बेधडक आवाज मुख्यसंपादक-(शरद पवार)
अभिमन्यू पवार आपण केलेला विकास सोशल मीडिया वरती फिरतोय हा विकास एवढा आश्चर्यकारक आहे की जनसामान्यांना यावरती विश्वासच बसणार नाही.कारण पाच वर्षांमध्ये स्वतःचा,नातेवाईकांचा व कार्यकर्त्यांचा एवढा विकास कोणीही पाहिला नसेल.आपण नेहमी म्हणत असता,मी औसा तालुक्याचा भरभरून विकास केला आहे, भरभरून विकास निधी आणला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता विकास झाला आहे का तर काही प्रमाणात झाला ही आहे.परंतु सर्वाधिक विकास आपल्या कार्यकर्त्यांचा नातेवाईकांचा व आपला झाल्याचा अनुभव सध्याला जनता घेत आहे. आता हे मित्र कोणते कार्यकर्ते कोणते आपला एवढा जनसंपर्क प्रगतिशील










कसा झाला, आपण एवढं विधानसभेवरती निवडून येण्याचं धाडस किंवा एवढा आत्मविश्वास दाखवीत आहात.तो याच कार्यकर्त्यांच्या व मित्र पक्षाच्या जीवावरती असेल यात काही शंका नाही. एवढं कार्यकर्त्यांना दिल्यानंतर एवढा आत्मविश्वास असणं साहजिकच आहे. परंतु आपण जर ह्या प्रॉपर्टी खरेदी किंवा मित्रपक्षाच्या नावे केल्या नसाल तर याची शहानशा आपणास करायची असेल किंवा जनतेला गलत ठरवायच असेल किंवा हे आरोप आपल्याला धुडकवून लावायचे असतील,व आता हे डॉक्युमेंट खरे का खोटे याची शहानिशा आपण करावी किंवा मतदार संघातील जनतेसमोर याचा खुलासा करावा किंवा मांडावा. आपण या पाच वर्षाच्या कार्यकाळात जनतेला
मुर्खात काढत स्वतःची व स्नेहकांची भरभरून ओंजळ भरून घेतली आहात हे आरोप जनतेतून होत असताना आपण व आपले कार्यकर्ते या आरोपांना डावलून विकासाचीच गंगा आम्ही वाहिली हे नेहमी बोलत असता. तर या सर्व विकासात किती तथ्य आहे व स्वतःच्या विकासात किती तथ्य आहे हे जनतेसमोर येणे भविष्यात गरजेचे आहे.असेच आमदार लातूर जिल्ह्याला लाभत असतील तर नक्कीच येथील जनते वरती तरुणांन वरती व शेतकऱ्यांन वरती उपासमारीची व आत्महत्येची वेळ नक्कीच येईल यात काही शंकाच नाही.पाहिला गेले तर आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे इलेक्शन किंवा सत्ता म्हणजे काय तर स्वतःचा भरभरून विकास हाच खरं राजकारण किंवा सत्ता असे म्हटलं जातं यात काही वावग तर नाहीच परंतु या म्हणीला पुरेपूर साजेसे आपण असावेत यात काही शंकाच उरली नाही.