रमेश आप्पा कराडांचे, विधानसभेत सुधाकर शृंगारे होणार! महायुती नावालाच रमेश आप्पांचं एकटा चलोत समाधान.

बेधडक आवाज मुख्यसंपादक (शरद पवार)
लातूर जिल्हा भाजपा मधील वाद हा विकोपाला गेल्याच चित्र सर्व लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुधाकर शृंगारे यांना आपसीवाद चांगल्याच प्रकारे भोवला आहे. याचे फळ स्वरूप त्यांना पराभव पत्करावा लागला. लोकसभा निवडणुकीमध्ये सुधाकर शृंगारे यांना अनेक भागात प्रचार न केल्याने व प्रचाराच्या पोलचिट्ट्या जागेवरच थप्पी लावून ठेवल्याने त्यांचा प्रचार व्यवस्थित रित्या होऊ शकला नाही. किंवा त्यांचा प्रचार जाणून बुजून करण्यात आला नसावा या कारणाने व आपसीवादामुळे सुधाकर शृंगारे यांना लोकसभेत बाकी नेत्यांचे पाठबळ न मिळाल्यामुळे सुद्धा सुधाकर शृंगारे जनसामान्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत

यामुळे त्यांचा पराभव निश्चित झाला होता. असंच काहीसं प्रकार विधानसभेच्या रणांगणात ग्रामीण मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश आप्पा कराड यांच्यासोबत ही घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील महायुती नावापुरतीच चालवली जाते की काय? असा प्रश्न मतदारसंघात अनेकांना पडला आहे. कारण रमेश आप्पा कराड त्यांच्या मतदारसंघातील गावागावात वैयक्तिक सभा, बैठका,प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. परंतु त्यांच्या प्रचारात कोणताही भारतीय जनता पार्टीचा जेष्ठ नेता किंवा पदाधिकारी नसल्याचं किंव्हा त्यांच्या प्रचाराला पाठ फिरवताना जागोजागी निदर्शनास येत आहे. तर रमेश आप्पा कराड यांचाही सुधाकर
शृंगारे होण्यास वेळ लागणार नाही अशीच काहीशी चर्चा मतदार संघात जागोजागी होताना पाहण्यास मिळते. व याउलट लातूर ग्रामीण मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मॅनेज आहे की काय?अशा हि चर्चेला उधाण आले आहे. असेच चालत राहिले तर भविष्यात विरोधी पक्षनेते धीरज देशमुख सव्वा लाखाच्या लीड ने विजयी होऊन विधानसभा नक्कीच गाजवणार यात काही शंकाच राहिली नाही. रमेश आप्पा कराड यांच्या कार्यकाळात जो निधी ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक उपलब्ध त्यांनी करून दिला.याचे फळ मात्र त्यांना मिळू शकत नसल्याचं जाहीर रित्या दिसून येत आहे.