सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ‘ईडी’ कारवाईचा लातूर काँग्रेसचा तीव्र निषेध; भाजप सरकारवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप.

लातूर | १८ एप्रिल:
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरील ‘ईडी’च्या कारवाईच्या निषेधार्थ लातूरमध्ये काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवनसमोर निदर्शने करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या कारवाईला “राजकीय सूडबुद्धी”ची लेबल लावत काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका करत म्हणाले, “मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठीच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर ‘ईडी’चा गैरवापर केला जात आहे. ही कारवाई म्हणजे लोकशाहीवर थेट हल्ला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “जनतेला हा अन्याय मान्य होणार नाही. हे सरकार विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहे.”
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी “ईडी ही भाजप भांडवलदार सरकारची एजन्सी झाली आहे”, “मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध करत केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र विरोध केला.
या आंदोलनात ॲड. किरण जाधव, अभय साळुंके, अमर खानापुरे, रविशंकर जाधव, सुभाष घोडके, कैलास कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, अजित माने, ॲड. देविदास बोरुळे पाटील, आयुब मणियार, भाऊसाहेब भडीकर, बिभीषण सांगवीकर, आसिफ बागवान, यशपाल कांबळे, राहुल डूमणे, निलेश देशमुख, ॲड. बाबा पठाण, शेख कलीम, खाजपाशा शेख, अभिजित इगे, युनूस शेख, फारूक शेख, पवनकुमार गायकवाड, सचिन कोतवाड, सिकंदर पटेल, सुपर्ण जगताप, तबरेज तांबोळी, ॲड. सुनीत खंडागळे, विष्णुदास धायगुडे, बालाजी झिपरे, सलीम तांबोळी, पिराजी साठे, धनराज गायकवाड, रिजवान देशमुख, इब्राहिम शेख, अमोल गायकवाड, अनिल शेळके, सोमनाथ तोटाळे, अशोक पोतदार, गोविंद शिंदे, महेश पवार, करीम तांबोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काँग्रेसने दिलेला संदेश स्पष्ट होता – विरोधकांना दाबण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष सुरूच राहील.