पालिकेची वृक्षतोडीस परवानगी, मग वृक्षप्रेमींचे हजारो वृक्ष लागवड/पोषण करण्या मागचे कष्ट व्यर्थच का?

Bedhadak awaj -लातूर शहरांमध्ये वेगाने होणाऱ्या विकास प्रकल्पांमुळे नैसर्गिक पर्यावरण धोक्यात आले आहे. रस्ते रुंदीकरण, मॉल आणि निवासी संकुलांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, महानगरपालिकेने मॉलच्या बांधकामासाठी व मॉलच्या शुभारंभा साठी झाडाची अडचण भासूने या साठी एका मोठ्या झाडाच्या फांद्या तोडण्यास परवानगी दिली. विशेष म्हणजे, झाडाचा मध्य भागही तोडण्यात आला असून, यामुळे नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

पर्यावरणाचे महत्त्व आणि झाडांचा विनाश
झाडे केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नसून, ती पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यावश्यक आहेत. ती हवा शुद्ध ठेवतात, तापमान नियंत्रित करतात आणि जैवविविधतेचे संरक्षण करतात. परंतु, शहरांमध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. झाडे नष्ट झाल्यामुळे उष्णतेचा स्तर वाढत असून, हवामान बदलाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
महानगरपालिकेची भूमिका आणि तक्रारी
महानगरपालिका विकास प्रकल्पांसाठी वृक्षतोडीस परवानगी देत आहे, मात्र त्याऐवजी नव्या झाडांची लागवड करण्यावर भर दिला जात नाही. महापालिकेचे आयुक्त या घटनेवर म्हणाले, मधून तोडल्याले झाड पुन्हा फुटेल”झाड पुन्हा उगवेल,” परंतु पर्यावरणतज्ज्ञांच्या मते अशा प्रकारे झाडांचा छेद झाला तर ते पुन्हा टिकणे कठीण होते.तसेच वेगवेगळ्या प्रकारची झाडे लातूर शहरात पाहायला मिळतात. यातील काही झाडे एका जागेवरून दुसऱ्या जागी तोडून हलवल्यानंतरही त्या जागी ते उगवू शकतात. परंतु काही झाडे असे आहेत की त्यांची तोड झाल्यानंतर ते पुन्हा त्या जागी तेवढ्याच प्रमाणात मोठे होतील असे होत नाही.
पर्यावरणप्रेमींचा आक्षेप
सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी यांनी या वृक्षतोडीवर आक्षेप घेतलेले सध्या तरी शहरात कुठे आढळून येत नाही. कुठे स्ट्रीट लाईटच्या दुरुस्ती कारणावरून झाडांची शहरात तोड होते तर कुठे मॉलच्या प्रसिद्धीमध्ये अडथळा निर्माण होणाऱ्या झाडांची जाणीवपूर्वक तोड केली जाते,या वरती प्रशासनाच्या भूमिकेवर शहरात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. “विकास हा निसर्गाची हानी करून होऊ नये. झाडे तोडण्याऐवजी त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे,” असे शहरातील नागरिक मत व्यक्त करत आहेत. तसे पाहता लातूर शहरात अनेक वर्षापासून वृक्षप्रेमींनी हजारो वृक्षांची लागवड व संगोपन केल्याचं लातूर शहरात पाहायला मिळतं. वृक्षप्रेमी मुळे लातूर शहराला एक नवीन सौंदर्य प्राप्त झाले असताना महानगरपालिकेच्या एका परवानगींमुळे त्या सौंदर्याचे चित्र विद्रूपीकरणांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेत आहे. यापुढेही असेच होणार असेल तर हजारो वृक्ष प्रेमींनी लाखो झाडांची लागवड व संगोपन करण्या मागचे सर्व कष्ट व्यर्थच जाणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शहरातील वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ
यापूर्वीही रस्ते रुंदीकरण, भले मोठे प्रकल्प आणि अन्य नागरी विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात झाडे कापण्यात आली आहेत. शहरातील हरितपट्ट्यांची संख्या झपाट्याने कमी होत असून, त्यामुळे उष्णता वाढत आहे. पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा वृक्षतोडीमुळे हवामान बदलाचा परिणाम अधिक तीव्र होईल.
नागरिकांनी पर्यावरणासाठी पुढे यावे
पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. वृक्षतोडीला विरोध करणे, स्थानिक प्रशासनावर दबाव टाकणे आणि नवीन झाडे लावण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे. अन्यथा, भविष्यात शहरातील तापमान वाढ, वायूप्रदूषण आणि पाण्याची टंचाई अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते.
शहराच्या विकासासोबत निसर्गसंवर्धनही महत्त्वाचे
विकास प्रकल्प आवश्यक असले तरी ते पर्यावरणपूरक असावेत. झाडे तोडल्यावर त्याऐवजी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली गेली पाहिजे. अन्यथा, निसर्गाचा समतोल बिघडेल आणि भविष्यात गंभीर संकटांना तोंड द्यावे लागेल.